Saturday 17 August 2019

'मिसाल मुंबई' उपक्रमांतर्गत वांद्रे येथे आणखीन एका नवीन बालवाडी व कौशल्य केंद्राची स्थापना !



रुबल नागी यांनी आदरणीय मंत्री श्री आशिष शेलार यांच्या सहकार्याने व रुबल नागी आर्ट फाऊंडेशनच्या पुढाकाराने 'मिसाल मुंबई' उपक्रमांतर्गत वांद्रे पश्चिम येथील आणखी एक ईडु-हब (बलवाडी) व कौशल्य केंद्र सुरू केलेले आहे. १६ ऑगस्ट रोजी आदरणीय आशिष शेलार आणि शेखर रवजियानी यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात आले. या प्रकल्पाचे उद्दीष्ट महिला आणि तरुणांना व्यावसायिक कौशल्य बांधणी आणि प्लेसमेंट समर्थनाद्वारे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन जगण्यासाठी सक्षम करणे हे आहे. कौशल्य बांधणी आणि रोजगार समर्थनाच्या दिशेने निर्देशित प्रयत्न, प्रशिक्षणार्थी नोकरी मिळवून त्यांना दर्जेदार कामगिरीसह टिकवून ठेवू शकतील. 


'मिसाल मुंबई' उपक्रमांतर्गत यापूर्वी ठाणे, वरळी, कोलाबा, प्रभादेवी, औरंगाबाद, नाशिक, विरार, नालासोपारा, गोवंडी ईडू-हब (बालवाडी) सुरु केले गेले आहे. आता वांद्रे पश्चिम येथील हे नवीन केंद्र अन्य ठिकाणी शालेय पूर्व कार्यक्रम आणि वितरण पद्धती समाविष्ट करेल. झोपडपट्टी, खेड्यातील मुलांसाठी व त्यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर मूलभूत कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि औपचारिक शाळांमध्ये त्यांचे संक्रमण सुलभ करण्यासाठी मदत प्रदान करण्याचा हा एक महत्वाचा मार्ग आहे. डिजिटल इंडिया पुढाकाराच्या विविध घटकांचा वापर करून नागरिकांना माहिती, ज्ञान आणि कौशल्य मिळवून देण्याचे व तरुण उद्योजक तयार करून झोपडपट्टीतील बदलाचे एजंट होणे हे 'मिसाल मुंबई' चे उद्दीष्ट आहे.

“मिसाल मुंबई-इंडिया” हा भारतातील झोपडपट्ट्यांमध्ये आणि खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणारा उपक्रम आहे.

No comments:

Post a Comment